गावाचा इतिहास
मौजे चुये हे कोल्हापुर जिल्हातील करवीर तालुक्यातील दुधगं गा नदी काठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. गावाचा इतिहास पाहायचा झालेस गावाचा मुळ पुरुष देवगीरी चे रावजी पाटील सन 1152 साली या ठीकाणी आले व चुये गावाची स्थापना झाली कोल्हापुर हुन पश्चिमेस 22 कि.मी. अंतरावर वसलेले गाव. गावात प्रवेश करताना गावाची स्वागत कमान लागते.
चुये गाव 100% हागणदारी मुक्त असलेने गावास सन 2007/2008 साली निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. तसेच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय हे सन 1954 साली नागरीकांच्या श्रमदानातुन पुर्ण दगडी दुमजली आर.सी.सी. इमारत बांधणेत आली व ग्र.पं स्थापने पासुन सदर इमारती मध्ये आज अखेर कारभार चालु आहे तसेच ही इमारत बांधणेकामी गावचे सामाजिक व्यक्तीमत्व श्री. श्रीपतराव हरी पाटील यांचे सहकार्य मोलाचे लाभले आहे .
तसेच गावामध्ये सर्व प्रथम water मीटर योजना सन 2005 साली यशस्वी रित्या राबविणेत आली आहे तसेच गावामध्ये 13 तरुण मंडळे व एक आजी माजी सैनिक संघटना आहे. या मध्ये माजी सैनिक 36 व आजी सैनिक 11 असे एकुण 47 सैनिक आहेत. तसेच गावामध्ये कै.कुमारी सुशिलाताई मगदुम सार्वजनीक मोफत वाचनालय चुये आहे.







